नवी दिल्ली – आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी इस्त्रोच्या टीमचे अभिनंदन केले आहे. तसेच या मोहिमेसाठी तुम्ही सर्व शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयत्नांच आम्ही कौतुक करतो, असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.
“आपण जवळ पोहचलोच होतो. मात्र,अगदी शेवटच्या क्षणी एक छोटा धक्का बसला, परंतु, हेच आपल यशाच पहिल पाऊल आहे. भारतीयांना आपल्या शास्त्रज्ञांचा अभिमान आहे. संपूर्ण देश तुमच्यासोबत उभा आहे. तुमच्या प्रयत्नांच आम्ही कौतुक करतो.” अस ट्विट करत त्यांनी इसरोला शुभेच्छा दिल्या.
We were almost there! India is proud of our scientists. A minor setback in the last stanza is a stepping stone for success. The nation stands with ISRO team at this hour and appreciates the exemplary efforts. ?
— YS Jagan Mohan Reddy (@ysjagan) September 7, 2019
चांद्रयान २ या मोहिमेमध्ये विक्रम लॅंडर हे १:३० ते २:३० च्या दरम्यान चंद्रावर लॅंड करण्यात येणार होत. मात्र, अगदी शेवटच्या काही क्षणी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटपर्यंत पोहोचले असताना संपर्क तुटला.