नवी दिल्ली: गॅलवान व्हॅलीमध्ये सोमवारी रात्री भारतीय आणि चिनी सैन्य यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत लष्कराचे कर्नल आणि दोन सैनिक ठार झाले. या संघर्षात चीनचे मोठे नुकसान झाले.
सीमेवर तणाव असताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सी.डी.एस. बिपिन रावत आणि तिन्ही सैन्यांचे अध्यक्ष यांच्यासमवेत पूर्वेकडील लडाखमधील सद्यस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस जयशंकरही उपस्थित होते. चीन सतत भारताशी बैठक घेण्याची मागणी करत आहे.
भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी त्यांच्या क्षेत्रात घुसखोरी केल्याचा आरोप चीनने केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी चीनची राजधानी बीजिंगमध्ये पत्रकारांना माहिती देताना सोमवारी भारतीय सैन्याने दोनदा सीमा ओलांडून चीनी सैन्यावर हल्ला केल्याचा आरोप केला. त्यानंतर दोन्ही बाजूने हाणामारी झाली. चीनने भारतासमोर निषेध नोंदविला आहे.