India vs Australia 3rd T20 Match Live Score : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ अजेय आघाडी मिळवेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही संघात अनेक बदल केले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियानेही प्लेइंग-11 मध्ये चार बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाच्या सलामीवीर ऋतुराज गायकवाडचे वादळी शतक व कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी केलेल्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर यजमान भारताने पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 223 धावा करण्याचे आव्हान ठेवले. भारतानं निर्धारित 20 षटकात तीन गडी गमावून 222 धावा केल्या.
Innings Break!
An unbeaten 123 off 57 deliveries from @Ruutu1331 guides #TeamIndia to a formidable total of 222/3.
Scorecard – https://t.co/IGWiF2zrJ7… #INDvAUS @IDFCFIRSTBank pic.twitter.com/7rBFgifEBk
— BCCI (@BCCI) November 28, 2023
ऋतुराज गायकवाडने 57 चेंडूत 123 धावांची नाबाद खेळी केली. ऋतुराजने आपल्या खेळीत 13 चौकार आणि सात षटकार मारले. याशिवाय टिळक वर्मानं 24 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. टिळक याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 59 चेंडूत 141 धावांची नाबाद भागीदारी झाली.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा ऋतुराज पहिला भारतीय…
भारताकडून T20 मध्ये शतक झळकावणारा ऋतुराज आठवा भारतीय ठरला. त्याच्या आधी रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, विराट कोहली, दीपक हुडा आणि सुरेश रैना यांनी ही कामगिरी केली आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मध्ये शतक झळकावणारा ऋतुराज पहिला भारतीय ठरला.
त्याआधी यशस्वी जैस्वाल सहा धावा करून बाद झाला तर इशान किशन खाते न उघडता बाद झाला. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने ऋतुराजसोबत तिसऱ्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. सूर्या 29 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 39 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसन, अॅरॉन हार्डी आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
शेवटच्या षटकात 30 तर पाच षटकात 79 धावा…
ऑस्ट्रेलियाने 20 व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलला गोलंदाजी दिली. 20 वे षटक मॅक्सवेलचे पहिले षटक होते आणि या षटकात ऋतुराजने तीन षटकार आणि एक चौकार मारला. भारताने 20व्या षटकात 30 धावा केल्या तर टीम इंडियाने शेवटच्या पाच षटकात 79 धावा केल्या.