जिनिव्हा – जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले की, भारतासह इतर देशांनी कोविड-19च्या चाचण्या वाढविल्या आहेत. मात्र, यामुळे या देशांमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे, असे म्हणता येणार नाही.
“डब्ल्यूएचओ’चे तज्ज्ञ डॉ. मायकल रेयान यांनी म्हटले की, भारतासारखे देश करोनाची अधिकाधिक चाचणी करीत आहेत. मात्र, आम्हाला असे वाटत नाही की, चाचण्या वाढविल्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे.
चाचण्या अधिक केल्यामुळे नवीन रुग्ण समोर येत आहेत, हे सत्य असले तरी त्यामुळे रुग्णांना लवकर शोधता येणे शक्य झाले असून त्यांना त्वरित उपचार दिला जात आहे. अनेक देशांनी सध्या चाचणीत वाढ केलेली दिसून येत आहे. त्याचबरोबर रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. हे रुग्ण अगोदरच बाधित असल्यामुळे चाचणी केल्याने ते समोर येत असल्याचे “डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे.