प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 -लोकशाहीचा प्रमुख स्तंभ असलेल्या न्याय संस्थेपुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या “न्याय-नितीचा’ आदर्श असावा असे मत कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी व्यक्त केले. फणी आळी तालीम मंडळाच्या “शिवरायांची न्याय निती’ या देखाव्याचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक श्रीमंत भाऊ साहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाळ तिवारी होते. यावेळी बालन यांनी गणेश मंडळाला शुभेच्छा देत गणेशोत्सवात अधिकाधिक सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. मंडळाचे अध्यक्ष ओंकार काळे, गणेश नलावडे, प्रा वाल्मिक जगताप, इंटक कामगार नेते राजेंद्र खराडे, नुरूद्गीन इमानदार, गोपाळ पायगुडे, महेश मोरे, भोईराज समाजाचे पंच नागेश खडके, जनार्दन पवळे, संघाचे कार्याध्यक्ष राकेश डाखवे, अनिल खराडकर, जगदीश भुतडा, खजिनदार किरण हुलावळे, सचिव आशुतोष मेमाणे, कार्याध्यक्ष योगेश दवे, अल्ताफ चांद मणियार, गणेश परदेशी, ओंकार शितोळे, अभिषेक खराडे, यश अनवेकर, मयुर घोडखिंडी यावेळी उपस्थित होते.