नवी दिल्ली – कोरोना महामारीला भारतात येऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ उलटला आहे. परंतु तरी सुद्धा भारतात कोरोनाची स्थिती आहे तशीच आहे. त्याचबरोबर कोरोना महामारीने पुन्हा एकदा वेग वाढवला आहे. या कोरोना महामारीचा सर्वाधिक परिणाम हा शाळेतील मुलांवर होत आहे. कारण मागील एक वर्षापासुन शाळेत गेलीच नाहीत. त्यामुळे मुलांचे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. अशातच आता उत्तरप्रदेशच्या योगी सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
योगी सरकारने यंदा इयत्ता 1 ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा घेता पुढील वर्गात ढकलले जाणार आहे. म्हणजे यंदा ही या मुलांची परीक्षा घेतली जाणार नाही. या बाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे डीजी विजय किरण आनंद यांनी दिले आहेत. या आदेशात सांगितले आहे की, नवीन शालेय सत्र 1 एप्रिल पासून सुरू होईल. आदेशानुसार 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मागील इयत्तेत मिळालेल्या गुण ग्राह्य धरले जातील. या शिवाय जिल्हा परिषद शाळेतील 8वी पर्यंतच्या परीक्षा सुद्धा टाळण्यात आल्या आहेत. ही परीक्षा 25 आणि 26 मार्चला होणार होती.
31 मार्च पर्यंत बंद राहणार शाळा
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 24 ते 31 मार्च पर्यंत पहिली ते आठवी पर्यंतची शाळा बंद ठेवण्यास सांगितले आहे. कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीला बघता हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
बोर्डाची परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकतात
10वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षेची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते. परंतु या तारखा कोरोनामुळे नाही तर पंचायत निवडणूकीच्या कारणामुळे पुढे ढकलल्या जाऊ शकतात. यूपीत बोर्डाच्या परीक्षा 24 एप्रिल पासून सुरू होणार होत्या. त्याचबरोबर या दरम्यान पंचायत निवडणूका होणार आहेत. त्यामुळे या परीक्षा आता मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात घेतल्या जाण्याची शक्यता आहेत. 27 मार्चला राज्य निर्वाचन आयोगाची पत्रकार परिषद आहे. त्यामुळे या परिषदेत परीक्षेच्या तारखांवर निर्णय घेतला जाऊ शकतो.