अमरावती : अमरावती येथे वार्षिक नियोजनाच्या बैठकीत राज्यमंत्री बच्चू कडू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधीच्या मागणीवरून शाब्दिक वाद झाले आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजनाची बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार अमरावती जिल्ह्यायासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र हा निधी कमी असून विदर्भाचा अनुशेष भरून निघावा यासाठी बैठकीत या दोन नेत्यांमध्ये वाद पेटला आहे.
बच्चू कडू या मुद्यावरून नाराजी व्यक्त करत म्हणाले, राज्यातील सरकारचा मी एक भाग असल्याने या बाबत काही बोलू शकत नाही मात्र विदर्भाचा अनुशेष भरून निघावा यासाठीच आपण अधिक निधीची मागणी केली होती. ही मागणी असताना निधी मात्र वाढवून देण्यात आला नाही. निधी वाढवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. असेही त्यांनी सांगितले.