आढळराव पाटील ः लांडेवाडीत कोविड कवच पुरस्काराचे वितरण
मंचर (प्रतिनिधी) – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कामकाज पारदर्शी आणि चांगले आहे. राज्याला कणखर नेतृत्व मिळाले असून, करोनाच्या लढाईत त्यांचे उत्तम काम सुरू आहे. सरकार आणि प्रशासन यांचा समन्वय असल्याने राज्य करोनामुक्त होऊन पूर्वपदावर लवकरच येईल, असे मत शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.
लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 27) “कोव्हिड कवच पुरस्कार’ वितरण प्रसंगी आढळराव पाटील बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके, सहसंपर्क प्रमुख सुरेश भोर, जिल्हा परिषदेचे गटनेते देविदास दरेकर, मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे, उपसरपंच धनेश मोरडे, लांडेवाडीचे सरपंच अंकुश लांडे, उपजिल्हा प्रमुख सुनील बाणखेले, तालुका अध्यक्ष अरुण गिरे, पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले, रवींद्र करंजखेले, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, प्रवीण थोरात, सचिन बांगर यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले की, करोनामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे, त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह सर्वच जण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. करोनाला हद्दपार करायचे असेल तर सोशल डिस्टन्सचा वापर करून गर्दी टाळली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबांची काळजी घेतल्यास आपोआपच करोनाचा दूर होईल. तसेच आंबेगाव तालुक्यातील प्रशासनाने करोना संदर्भात सुरू असलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना कोविड कवच पुरस्कार देऊन सन्मान केल्याबद्दल त्यांच्या कामाची ऊर्जा आणखीन वाढेल.
पुरस्कार विजेते योद्धे
तहसीलदार रमा जोशी, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, डॉ. सुरेश ढेकळे, सरपंच दत्ता गांजाळे, प्रीती थोरात, अनिता आढारी, अंकुश लांडे, अनिल डोके, पोलिस पाटील बबुशा वाघ, विठ्ठल वळसे, रोहिदास सोनवणे, गोरक्ष नवले, उत्तम जाधव, नितीन मेंगडे, अंगणवाडी सेविका-शालन सोनवणे, सुरेखा दैने, विजया थोरात, सुनीता भालेराव, जयश्री कर्पे, आरोग्य सेविका सुषमा उंडे, वंदना धादवड, नम्रता शिंदे, वंदना तळपे, गीता भोर, वैजयंता गव्हाणे, अर्चना निंबाळकर, मनिषा काळे, सोनाली बारवे, रेखा कंधारे, लता थोरात, गीतल गावडे, विजया धुमाळ, शीतल काकडे, रुग्णवाहिका चालक गौरव बारणे, गणेश काळे, अमित काटे.