राजगुरूनगर – खेड तालुक्यात बारावीच्या परीक्षेसाठी राजगुरूनगर, पाबळ, चाकण, वाडा आणि मरकळ या ५ केंद्रावर ५,३४१ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत, अशी माहिती प्रभारी गट शिक्षणाधिकारी जीवन कोकणे यांनी दिली.
खेड शिक्षण विभागांतर्गत बारावीच्या खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील ३५ शाळामधील ५,३४१ विद्यार्थ्यांची राजगुरूनगर, पाबळ, चाकण, वाडा आणि मरकळ केंद्रावर परीक्षा होत आहे. राजगुरूनगर केंद्रावर २५०१ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पाबळ केंद्रामध्ये ५६१ विद्यार्थी, चाकण केंद्रात १४८५ विद्यार्थी वाडा केंद्रात ३९२ विद्यार्थी तर मरकळ केंद्रावर ४०२ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
बारावीच्या परीक्षेसाठी खेड तालुका कस्टडी अंतर्गत ५३४१ विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका पुरविण्यात येत आहेत. परिक्षेसाठी सर्व केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक यांची सभा घेऊन नियोजन करण्यात आले आहे. १०० गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास जास्तीचा वेळ देण्यात आला आहे.
सकाळी साडेदहा वाजता पेपरला सुरुवात झाली. प्रत्येक केंद्रावर बैठे पथक ठेवण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी खेड तालुक्यात प्रभारी गट शिक्षणाधिकारी तथा परीक्षा नियंत्रक जीवन कोकणे यांचे मार्गदर्शनाखाली विजय सुरकुले, भगवान बनकर, शिवाजी सुकाळे, संजय घुमटकर, बाळासाहेब दुंडे,अविनाश सांडभोर,प्रकाश शिंदे,भरत मंडलेयांनी निवड करण्यात आली आहे.