मुंबई – बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खान नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. त्याबरोबर ते सोशलवरही बेधडकपणे सामाजिक मुद्यांवर आपलं मत मांडतात. यातच ते पुन्हा एकदा एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे.
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये कबीरने मुघलांना कमी लेखणारे चित्रपट पाहणे हे अडचणीचे तसेच लज्जास्पद वाटते असं मत त्यांनी मांडलं आहे. ते पुढे म्हणाले, बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट आहे ज्या ऐतिहासिक संदर्भांवर आधारित नसतात. अशा चित्रपटांमध्ये लोकप्रिय मिळवण्यासाठी कथानकानुसार चित्रपट तयार केले जातात. या चित्रपटांमध्ये घलांना चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकेत पाहून आपल्याला त्रास होतो.
ते पुढे म्हणाले,’हिंदी चित्रपटांमध्ये इतिहासातील मुस्लीम शासकांना तसेच मुघलांना कमी लेखण्याच काम केलं जात. अशा चित्रपटांचा मला आदर वाटत नाही. मी असे चित्रपट बघतही नाही. ‘