आळंदी – माउलींची पालखी ठीक दुपारी १ वाजता पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. यंदा करोनामुळे 48 दिवस पायी चालणारा वारकरी केवळ आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरीत दाखल होणार आहे.
यंदा केवळ 20 वारकऱ्यांना पंढरीला जाण्याची मुभा देण्यात आली आहे. माऊलींच्या पादुका या शिवशाही बसने नेणार आहे. बसला सकाळी सुवासिक फुलांनी सजविण्यात आले. त्याचबरोबर बसला संपूर्णपणे सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. केवळ मंदिरात लगबग सुरू असून संपूर्ण आळंदी सुनीसुनी आहे.
सकाळी नित्याच्या पूजानंतर माऊलींच्या चल पादुकांवर दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी उपस्थित मोजक्याच वारकऱ्यांनी ज्ञानोबा-तुकोबा-विठोबाचा गजर केला.