बारामती – आपल्या राज्यातील शेतीपंपाचे 40 हजार कोटी रुपये थकले आहेत. यामुळे महावितरण, महापारेक्षण कंपन्या अडचणी आल्या आहेत. त्यामुळे सरकारने थकीत विजबिलासाठी नवीन योजना आणली आहे.
50 टक्के वीज बिलात सवलत देऊन राहिलेले वीजबिल भरण्याची योजना आणली. ते नाही भरल्यास अडचणीत याल तुमची वीजबिल कट होईल याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटले आहे. ते बारामतीत एका पतसंसंस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते.