मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी इंडिया टुडे आणि सी व्होटर(मूड ऑफ नेशन)द्वारे करण्यात आलेल्या सर्वेनुसार राज्यासह संपूर्ण देशात एनडीएला झटका बसू शकतो, असे या सर्व्हेत म्हटले आहे. रिपोर्टनुसार याचा थेट परिणाम महाराष्ट्रात शिंदे-भाजपा युतीवरही होईल, असे म्हटले आहे. दरम्यान, या मुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्व्हेबद्दल बोलताना तो विश्वासार्ह नसल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले होते. यावरून संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली होती, त्यांच्या टीकेला शिंदे गटाकडून आता सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीएका वृत्तवाहिनीशी बोलताना, “मूळातच ते आमच्या मतावर निवडून राज्यभेत गेलेले आहेत, थोडी जरी त्यांना नैतिकतेची जाणीव असेल, तर आम्हाला आव्हान देण्याऐवजी त्यांनी राज्यसभेच्या आपल्या जागेचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावं. छोटीशीच तर निवडणूक असते, फक्त आमदाराच मतदान करणार आहेत, तेवढा तरी एकदा त्यांनी प्रयोग करून बघावा.”असे त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय, “जे झोपतात ते स्वप्न बघतात, जे जागे असतात ते काम करत राहतात. आमचे मुख्यमंत्री रात्रंदिवस काम करतात, दोन किंवा तीन तास फक्त झोप घेतात. त्यांना स्वप्न बघण्या एवढी सुद्धा फुरसत नसते, आम्हाला सुद्धा स्वप्न बघण्याएवढी फुरसत नसते.” असेही केसरकरांनी यावेळी सांगितले.