पुणे -सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. यातून फूड डिलिव्हरी करणाऱ्या अनेक फूड कंपन्या बक्कळ कमाई करीत आहेत. परंतु, बऱ्याच वेळा डिलिव्हरी ऍपवरून मागविलेले पदार्थ खराब असतात, अशावेळी ग्राहक याबाबत तक्रार करू शकतो. अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यात (ऋेव डरषशीूं रपव डींरपवरीवी , 2005) ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासंदर्भात अनेक तरतुदी आहेत.
जेवणाची गुणवत्ता वा सेवा संदर्भात काहीही गडबड वाटली तर ग्राहक तक्रार करू शकतात. ग्राहक अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, 2006 मधील कलम 31 नुसार प्रत्येक रेस्टॉरंट मालकाला व्यवसाय चालवण्यासाठी एक खाद्य परवाना दिलेला असतो. रेस्टॉरंट मालकाने नियुक्त अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करून परवान्यासाठी अर्ज घेतलेला असतो. जर एखादा रेस्टॉरंट मालक विनापरवाना खाद्य व्यवसाय करीत असेल तर त्याला सहा महिन्यांचा तुरुंगवास व जास्तीत जास्त पाच लाख रुपयांचा दंड, अशी शिक्षेची तरतूद आहे. ग्राहकांना षीीरळ.र्सीें.ळप या अधिकृत वेबसाइटवर तक्रार नोंदवू शकतो.