मुंबई – शिंदे- फडणवीस- पवार सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार, पालकमंत्री यांचा निर्णय गुरुवार संध्याकाळपर्यंत झालेला असेल असे मत, खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे. तर मंत्रिमंडळ विस्तार हा काही तिढा नाही, याच स्तरावर हे निर्णय घेतले जाणार असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीकडे आपण पाहत नाही. आम्ही सर्वांनी एकमताने आणि ताकदीने पुढे जाण्याचे ठरवले आहे, असे वक्तव्यही तटकरेंनी यावेळी केले.
तटकरे पुढे म्हणाले की, रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन आम्ही कधी आग्रही नव्हतो, एकत्रित काम करत असताना जाणीव ठेवून काम करणे गरजेचे असते,
मला वाटते या संदर्भात मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असेही त्यांनी म्हटले आहे. तर अजित पवार मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून दिल्लीत गेले नाही म्हणून ते दिल्लीत गेले आहेत, असे मतही तटकरे यांनी व्यक्त केले आहे.