नवी दिल्ली – कोरोना विषाणू महासाथीमुळे अवघ्या जगासमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कोरोनाला पूर्णपणे अटकाव करण्यासाठी सध्या जगाच्या पाठीवरील सर्वच देश कोरोना लस मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतामध्ये देखील केंद्र सरकारतर्फे जनतेला कोरोना लस मिळवून देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अशातच आज आयसीएमआरने कोरोनाची लस आणि लसीकरणाबाबत मोठं विधान केलंय.
आयसीएमआरने लसीकरणाबाबत माहिती देताना, कोरोनावरील लस ही देशातील प्रत्येक नागरिकाला द्यावी लागणार नाही, असं महत्वपूर्ण विधान केलं आहे. याबाबत, ‘कोरोनावरील लसीकरण हे लस कितपत प्रभावी आहे त्यावर सर्वकाही अवलंबून असेल.’ असंही आयसीएमआरने स्पष्ट केलं.
Vaccination would depend on the efficacy of the vaccine & our purpose is to break the chain of #COVID19 transmission. If we’re able to vaccinate critical mass of people & break virus transmission, then we may not have to vaccinate the entire population: ICMR DG Dr Balram Bhargava https://t.co/JF2vzdG7ml pic.twitter.com/OJk5QMuDFE
— ANI (@ANI) December 1, 2020
‘कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडणे हे आमचे लक्ष्य आहे. जर आम्ही धोका असलेल्या अधिकाधिक लोकांचे लसीकरण करून कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यात यशस्वी ठरलो तर कदाचित आम्हाला देशातील संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करावे लागणार नाही.’
याबाबत आरोग्य सचिवांनी सांगितले की, केंद्र सरकारने संपूर्ण देशात लसीकरण करण्याचा दावा कधीही केलेला नाही. अशा शास्त्रीय गोष्टींबाबत तथ्थ्यांच्या आधारावर बोलले गेले पाहिजे, असे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.
I just want to make this clear that the govt has never spoken about vaccinating the entire country. It’s important that we discuss such scientific issues, based on factual information only: Health Secretary on being asked how much time it will take to vaccinate the entire country pic.twitter.com/cZeEQr8Pvw
— ANI (@ANI) December 1, 2020