मुंबई : नीरज गुंडे नावाचा माणूस फडणवीसांचा हस्तक आहे. त्याला मंत्रालयात आणि कोणत्याही अधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये थेट जाण्याचा अधिकार होता. तो फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात वर्षा बंगल्यावरही बिनदिक्कत ये-जा करीत असे.
त्याच्या मार्फत फडणवीस हे वसुलीचे काम करायचे आणि त्याच्या मार्फतच त्यांनी मायाजाल चालवले होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्या आरोपाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, नीरज गुंडे यांच्याशी माझे संबंध आहेतच.
ते नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, पण असे आरोप करण्यापूर्वी मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी नीरज गुंडेबाबत चर्चा करून घ्यावी, अशी सूचना फडणवीस यांनी या आरोपावर केली आहे. कदाचित माझ्याही आधीपासून गुंडे यांचे मुख्यमंत्र्यांशी संबंध असावेत, असे मतही फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.