अमरावती – मी कशासाठी ही तयार असतो, माझ्या बॅगमध्ये आठ शर्ट असतात. शाही फेकली की मी लगेच दुसरे शर्ट घालतो. आतापर्यंत दोनदा शाई फेकली पण मी तिसऱ्या मिनिटाला लगेच बाहेर पडतो. यापूर्वी दोनदा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकीच्या घटना घडल्या आहेत. यावर पाटलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पाटील म्हणाले की, दर आठवड्याला अमरावतीला यावे असा माझा संकल्प आहे. मेळघाटमध्ये मोठा निधी जातो पण अंमलबजावणी होत नाही हे माझ्या निदर्शनास आले त्यामुळे मी मेळघाटात जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या मुद्यावर येत्या 24 ऑक्टोबरच्या आधी काय करता येईल, यावर विचार करीत आहेत. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. पण, आरक्षण टिकणारे हवे आहे की ढिले हवे आहे, याचाही विचार मनोज जरांगे पाटील यांनी केला पाहिजे, मराठा आरक्षण टिकणारे हवे असेल, तर त्याला जो वेळ लागतो, तो दिला पाहिजे.
या विषयावर अनेकांनी अभ्यास केला आहे. त्या विविध तज्ज्ञांची मते जाणून घेतली पाहिजे. या विषयावरील जाणकारांनी महत्वाची माहिती सरकारला द्यावी, त्यांनीही परिश्रम घ्यावेत. न्यायालयीन प्रक्रियेला कशा प्रकारे गती मिळेल, याचे मार्गदर्शन करावे. मराठ्यांचा कुणबी जातीत समावेश केला, तर हा निर्णय टिकू शकेल काय, यासाठी सरकारला मदत केली पाहिजे, असेही पाटील यांनी यावेळी म्हटले.
चार हजार मराठा तरुणांना नोकऱ्या –
मराठा समाजातील 4 हजार तरुणांना आरक्षण देऊन त्यांना नोकरी सुद्धा सरकारने दिली आहे. याशिवाय आरक्षण दिल्यानंतरही सरकार आपले दुश्मन आहे अशा भूमिकेत काम करण्याचे काही कारण नाही असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी जरांगे यांना दिला आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार आत्ता तुम्हाला हे राजकीय आरक्षण देता येईल पण गायकवाड कमिशनने अभ्यास करून दिलेले नाही त्यामुळे टिकणारे आरक्षण देण्याचे प्रयत्न सरकारचा आहे, असेही पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.