संतोष पवार
सातारा -देशावर सुमारे 60 वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या कॉंग्रेस पक्षाची गेल्या पंधरा वर्षात मोठी पिछेहाट झाली. सातारा जिल्हा तर कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, या किल्ल्याचे अनेक बुरुज निसटून गेल्याने जिल्हा कॉंग्रेस खिळखिळी झाली. कॉंग्रेस पक्षाने अनेक आघात झेलले. अनेक जण स्वार्थ साधत दुसऱ्या पक्षात गेले.
मात्र, आजही कॉंग्रेसच्या निष्ठावंतांनी कॉंग्रेसला उभारी देण्याचाच प्रयत्न केला आहे. अंतर्गत कलह, वादविवाद टाळत आता कॉंग्रेसने “हम साथ साथ है’चा नारा दिला आहे. प्रत्येक तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करुन आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद दाखवून देण्याचा निर्धार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कॉंग्रेसला आणखी मजबुती देण्याचा प्रयत्न असून पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यानुसार जिल्हाभर नियोजन केले आहे.
इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यानंतर सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने अनेक वर्षे देशाची सत्ता ताब्यात ठेवली. कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून हाताचा पंजा चिन्हाची जादू जिल्ह्याने अनुभवली आहे. त्याकाळात कॉंग्रेसमध्ये निष्ठावंतांची मोठी फौज होती. पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम होत होते. मात्र, गेल्या 12 ते 15 वर्षात कॉंग्रेसला उतरती कळा लागली. नरेंद्र मोदी यांच्या जादूने देशात
बालेकिल्ल्यात मजबुती येणार का?
एकेकाळचा कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या जिल्ह्यात गेल्या 12 ते 15 वर्षात कॉंग्रेसची अपरिमित हानी झाली. कॉंग्रेसने पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे मजबुतीकरण जिल्ह्यात सुरु आहे. जिल्हा व तालुकास्तरावर याबाबत नियोजन करण्यात येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीला यश येणार का, बालेकिल्ला मजबूत होणार का, हे आगामी काळातच दिसून येणार आहे.