मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत भारतातील मोठ्या 10 शहरांतील घरांचे दर 2.8 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत घरांचे दर 3.1 टक्क्याने वाढले होते.
रिझर्व्ह बॅंक अहमदाबाद, बंगलोर, चेन्नई, दिल्ली, जयपुर, कानपूर, कोची, कोलकत्ता, लखनऊ आणि मुंबईतील घरांच्या आकडेवारीचा विचार करते. या दहा शहरात घरांच्या किमती विषम पद्धतीने वाढल्या आहेत. कोची येथे घराच्या किमती 7.1 टक्क्यांनी वाढल्या. तर जयपूर येथे या कालावधीत घरांच्या किमती 9 टक्क्यांनी कमी झाल्या.
जयपुर बरोबरच लखनऊ, कोलकाता येथील घरांचे दर कमी झाले. मात्र इतर शहरातील घराच्या किमतीत थोडीफार वाढ झाली असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. 2007 मध्ये रिझर्व बॅंकेने मुंबईतील घराच्या किमतीच्या आधारावर आकडेवारी जाहीर करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर हळूहळू आणखी नऊ शहराचा या आकडेवारीत समावेश केला जात आहे. या शहरातील घर विक्रची आकडेवारी जमा केली जाते. त्या आधारावर हा अहवाल तयार केला जातो.