नागपूर – लोकसभा निवडणूकीच्यावेळी सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आक्षेप घेणारी याचिका रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काल फेटाळली. नागपूरमधील रहिवासी मोहम्मद नफिस खान यांनी गडकरी यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली आहे.
गडकरी यांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याने त्यांच्या निवडणूकीला आव्हान देण्यात यावे, अशी मागणी या निवडणूक याचिकेत केली गेली आहे. ही याचिका रद्द करण्यास न्या. ए.एस. चांदुरकर यांनी नकार दिला.
मात्र गडकरी यांचे कुटुंबीयाम्चे उत्पन्न, मालकीची जमीन आणि निवडणूकीदरम्यान केलेल्या खर्चाशी संबंधित आरोप न्यायालयाने रद्द केले. पण नागपूरातील गडकरी यांच्या वैयक्तिक मालकीची जमीन आणि या शेतजमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत गडकरी यांनी दिलेल्या माहितीशी संबंधित मुद्दे रद्द करता येऊ शकत नाहीत. त्यामुळे या निवडणूक याचिकेवर सुनावणी होणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने साम्गितले.
जमीन गडकरी यांच्या स्वतःच्या मालकीची असल्याने जमीन कुटुंबाच्या मालकीची असल्याचा दावा खोटा असल्याचे खान यांनी याचिकेत म्हटले आहे.