राजगुरूनगर – तालुक्यातील कुमंडला नदीवरील कडूस जवळचा पूल पाण्याखाली गेल्याने जवळपास २० गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच वाडा राजगुरूनगर रस्त्यावरील गुंडाळवाडीतील जवळी पूलसुध्दा पाण्याखाली गेल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक काही तास ठप्प झाली आहे.
सलग दोन दिवस भोरगिरी भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पश्चिम भागातील रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले आहेत.
दरम्यान आज सकाळपासून झालेल्या जोरदार पावसामुळे कुमंडला नदीला पूर आल्याने कडूस गावाजवळील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आंहे . गुंडाळवाडी जवळी पूल पाण्याखाली गेल्याने राजगुरुनगर वाडा रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
भोरगिरी भीमाशंकर परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे ओढे नाले आणि नद्यांना पुराचे स्वरूप आले आहे. कुंमडला, आरळा आणि भिमानदी दुथडी भरून वाहत आहे. चास कमान धरण 85 टक्के भरले आहे. धरणात सरासरी 30 हजार क्यूसेस वेगाने पाणी जमा होत असून धरणातून भिमानदीत रात्री पर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे भिमानदीला मोठ्या पुराचे स्वरूप येणार असून धारणाखालील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.