नवी दिल्ली – बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आज पूर्ण झाला असून उद्या पेटा आपली बाजू मांडणार आहे. उद्या सकाळच्या सत्रात सुनावणीला सुरुवात होणार असून पेटाच्या युक्तिवादानंतर निकाल अपेक्षित आहे.
2017 साली मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली. त्यानंतर ही बंदी उठवण्यासाठी विधानसभेपासून लोकसभेपर्यंत मागणी झाली. घोडा-बैलांवरील अत्याचार थांबावेत म्हणून एकाच गाडीला घोडा-बैल जुंपण्यास बंदी होती.
शर्यतीत बैलांना चाबकानं, मोठ्या काठीनं अमानुष मारणे, बॅटरीचा शॉक देणं, टोकदार खिळे लावणे असे अनेक प्रकारे अत्याचार केले जातात, असे सांगत प्राणीमित्रांनी शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी केली होती.