पिंपरी – कोणत्याही प्रकारचा घातक कचरा जाळणे, कायद्याने बंदी आहे. मात्र, पिंपरीतील गांधीनगर परिसरात असा कचरा सर्रास जाळला जात आहे. त्यामुळे वायु प्रदुषणात भर पडत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासानाने तातडीने याबाबत योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी नागरिक करत आहेत.
गांधीनगर परिसरात वायर, टायर, प्लास्टिक सारखा घातक कचरा जाळला जात आहे. त्यामुळे विषारी धुराचे लोट पसरत आहेत. त्याचा शेजारी राहणारे रहिवासी, सोसायटीतील सदनिकाधारक तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे.
असे प्रकार वारंवार होत असल्याने शेजारील सोसायटीतील नागरिकांना त्याचा खुपच त्रास वाढला आहे. शनिवारी मोठ्या प्रमाणात परिसरात दुर्गंधीयुक्त धुर पसरल्याने सोसायटीतील नागरिकांचा गोंधळ उडाला. घरातील वायरिंग जळाली की काय, असा भास अनेकांना झाला.