वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे आंदोलनादरम्यान मोटार अंगावरून गेल्याने आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज ३ महिला शेतकरी आंदोलकांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तीन आंदोलक महिलांचा मृत्यू झाला आहे तर 3 महिला शेतकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
ही घटना हरियाणातील बहादुरगड या ठिकाणी घडली आहे. आंदोलक महिला शेतकरी डिव्हायडर बसल्या होत्या दरम्यान एक भरधाव ट्रक आला आणि या महिलांना चिरडून गेला. या भयंकर अपघातात तीन आंदोलक महिलांचा मृत्यू झाला आहे तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे.
अलीकडे वाहनांच्या अपघातामध्ये ट्रक किंवा जड वाहन चाकलांचा बेजबाबदपणा दिसून येत आहे. या वाहनांमुळे अनेक अपघात घडताना दिसून येत असून गेल्या काहीदिवसात अशा प्रकारच्या अपघात लक्षणीय वाढ झाली आहे. असे जरी असले तरी वाहचांलकांचा बेजबाबदरपणा मात्र कमी होताना दिसून येत नाही आहे. त्याचा परिणाम मात्र निष्पाप लोकांला होत आहे. ही बाब गंभीर आहे.