मुंबई : विधानपरिषद निवडणुकांवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे विश्वासू मानले जाणारे नेते एकनाथ शिंदे यांचं दिवसभर चाललेलं ‘नॉट रिचेबल नाट्य’ चांगलच गाजत आहे. शिवाय राजकीय वर्तुळात सध्या महाविकासाआघाडी सरकार टिकेल की पडेल याबाबत चर्चा सुरु असताना भाजपच्या खासदार नवनीत राणा यांचं ट्विट चर्चेत आले आहे. ‘मुंबई ते दिल्ली विमान प्रवास दरम्यान वाचली हनुमान चालीसा, उद्धव ठाकरेंची उलटी गिनती सुरु’ अशा आशयाचे ट्विट नवनीत राणा यांनी केले आहे.
मुंबई ते दिल्ली विमान प्रवास दरम्यान वाचली हनुमान चालीसा, उद्धव ठाकरेंची उलटी गिनती सुरु pic.twitter.com/AmqbxNkm4V
— Navnit Ravi Rana (Modi Ka Parivar) (@navneetravirana) June 21, 2022
आपल्या कर्मानेच उद्धव ठाकरे सरकार पडेल
या ट्विट सोबत त्यांनी एक आपला फोटो देखील शेअर केला आहे ज्यात त्या विमानात बसलेल्या दिसत आहेत आणि त्यांच्यात हनुमान चालीसाचे पुस्तक असल्याचे देखील दिसत आहे. शिवाय माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, राज्यसभा आणि विधान परिषदेत जर अशा पद्धतीने मतदान होत असेल तर, महाविकास अघाडीत शिवसेनेचे आमदार खूश नाहीत. त्यांनीच भाजपच्या उमेदवारांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करत विजयी केले. आम्ही गेल्या आडीच वर्षांपासून महाराष्ट्राल बुडताना बघत आहोत. महाराष्ट्रावरील संकट लवकरच दूर व्हायरला हवे. आमदार राज्याचे नुकसान होताना बघू शकत नाहीत आणि लवकरच हे संकट दूर करायला हवे. शिवसेनेतील अतर्गत मतभेदातूनच हे संकट निर्माण झाले आहे. एवढेच नाही, तर आपल्या कर्मानेच उद्धव ठाकरे सरकार पडेल, असेही त्या म्हणाल्या. आता सध्या विधान परिषद निवडणुकांवरून राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना नवनीत राणा यांनी केलेले ट्विट लक्ष वेधून घेत आहे.