प्रवाशांनी केली संरक्षक कठडे बसविण्याची मागणी
मंचर- आंबेगाव आणि खेड तालुक्यांना जोडणारा गावडेवाडी येथील वाघदरा घाटात असलेली धोकादायक वळणांना संरक्षक कठडे नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक वळणे काढून घाटातील रस्ता सुस्थितीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वाळूने भरलेला ट्रक दरीत पलटी होऊन चालक विजय गावडे यांचा मागील महिन्यात मृत्यू झाला होता. गावडेवाडी-वाफगाव हद्दीत तीन दगड खाणी आहेत. या खाणीतील दगड, रेती आणि खडीची वाहतूक गावडेवाडी मार्गे मंचर, अवसरी, निरगुडसर, खेड, नारायणगाव इत्यादी ठिकाणी केली जाते. परंतु, वाघदरा घाटात दोन ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. रस्त्यावर कोठेही दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांना रात्रीच्या वेळी धोकादायक वळणे लक्षात येत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी माजी उपसरपंच किरण गावडे यांनी केली आहे.