मुंबई – यंदाच्या उन्हाळ्याचा दाह संपूर्ण देशामध्ये जाणवला. महाराष्ट्रात देखील यंदा अनेक ठिकाणी उन्हाचा पारा एवढा चढला की गेल्या अनेक दशकांचे विक्रम मोडले. उन्हाने जनता हैराण झालेली असतानाच आता भारतीय हवामान विभागाकाडून दिलासा देणारी बातमी दिली आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं अर्थात मान्सूनचं बंगालच्या उपसागरात १६ मे रोजी आगमन झालं आहे. याशिवाय केरळमध्ये येत्या २७ मे रोजी पावसाचं आगमन होणार असल्याचं देखील हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील जनता देखील मान्सूनची वाट पाहत असून महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याचाही अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होईल याबाबत माहिती देताना, येत्या ५ जून रोजी महाराष्ट्रात तळ कोकणात मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवला. राज्यातील खरीप हंगामापूर्वी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये त्यांनी ही माहिती दिली.
खरीप हंगामासाठी आवश्यक पाऊस होणार का?
राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत या हंगामासाठी आवश्यक असणारा पाऊस यंदा होईल की नाही, याबाबत होसाळीकर यांनी भाष्य केले. संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज होसाळीकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
मराठवाड्यावर यंदा पावसाची मेहर नजर
दरम्यान, होसाळीकर यांनी आढावा बैठकीत दिलेल्या माहितीनुसार यंदा मराठवाड्यामध्ये Above Normal म्हणजेच सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात देखील समाधानकारक पाऊस राहण्याची शक्यता आहे. देशात ला नीनाची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Rainfall forecast by IMD for coming 4 weeks.
Already good rainfall over southern peninsula in last couple of days. Enhancement in rainfall activity is likely over west coast in all weeks & bay picking up from from wk 2,3 onwards too.
Looks promising situation for SW Monsoon. pic.twitter.com/ezf6Lx9c13— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 19, 2022