मुंबई : देशभरात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना, महाराष्ट्र राज्यातून एक चांगली बातमी समोर आली आहे. राज्यातील १५ करोनाबाधितांची प्रकृती सुधारली असून त्यांना लवकरच डिस्चार्ड मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यातील १५ रूग्ण बरे होतात ही एक आपल्या सर्वासाठी समाधानाची बाब आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. आपण जर योग्य काळजी घेतली तर कोरोनापासून माणूस बरा होऊ शकतो, अस आवाहन राजेश टोपे यांनी केलं.
या १५ रूग्णांमध्ये आौरंगाबादमधील १, पुण्यातील २ आणि मुंबईतील १२ अशा एकूण १५ जणांना डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. आज एकूण १०६ रूग्ण अॅडमिट असून त्यातील २ अतिदक्षता विभागात (आयसीयू) आहेत. इतर सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती देखील आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.