Modi government – मोदी सरकारने (Modi government) शेतकऱ्यांसाठी (farmers) मोठा निर्णय घेत दिवाळी (diwali) सणापूर्वीच भेट दिली आहे. सहा रब्बी पिकांच्या आधारभूत किंमतीत म्हणजेच एमएसपीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
याचा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सहा पिकांच्या आधारभूत किंमतीत सुमारे 2 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
सरकारने एकूण 6 पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बार्ली, गहू, हरभरा, मसूर, मोहरी आणि सूर्यफूल यांचा समावेश होतो. गव्हाच्या आधारभूत किंमतीत 150 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
तेलबिया आणि मोहरीच्या एमएसपीमध्ये 200 रुपये प्रति क्विंटल, मसूर 425 रुपये प्रति क्विंटल, बार्ली 115 रुपये, हरभरा 105 रुपयांची वाढ आणि सूर्यफुलाच्या दरात 150 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या वाढीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
देशभरातील सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट इतकी निश्चित करण्याच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 च्या घोषणेनुसार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या सरासरी उत्पादन खर्चावर अपेक्षित सर्वात जास्त 102% भाव गव्हासाठी मिळणार असून,
त्या खालोखाल पांढरी-काळी मोहरी या पिकांसाठी 98%, मसुरला 89%, हरभरा आणि बार्लीला प्रत्येकी 60%, तर करडईला 52% अधिक भाव मिळणार आहे. रब्बी पिकांच्या या वाढलेल्या एमएसपीमुळे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळतील आणि पीक विविधतेला प्रोत्साहन मिळेल.
पिके – किमान आधारभूत किमत 2023-24 – 2024-25 – वाढ
गहू – 2,125 – 2,275 – 150
बार्ली – 1,735 – 1,850 – 115
हरभरा – 5,335 – 5,440 – 105
मसूर – 6,000 – 6,425 – 425
मोहरी – 5,450 – 5,650 – 200
सूर्यफूल – 5,650 – 5,800 – 150
महागाई भत्त्यात वाढ !
दिवाळी आधीच केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्तामध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के करण्यात आला आहे. या निर्णयामुळे त्यांच्या मासिक भत्त्यात वाढ होणार आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात येणार असून याचा 48 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे 65 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस !
आर्थिक वर्ष 2022-23साठी रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाच्या समतुल्य पीएलबी म्हणजेच उत्पादनाशी निगडीत बोनस मंजुर करण्यात आला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने 11,07,346 रेल्वे कर्मचाऱ्यांना 1968.87 कोटी रुपयांचा उत्पादनाशी निगडीत बोनस द्यायला मंजुरी दिली आहे.