मुंबई – खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचा उल्लेख करत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा शिवसेनेला विसर पडला आहे, असे राणा म्हणाल्या आहेत. परिणामी राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून राणा यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.
मी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणणारच आणि मला कोणी रोखू शकत नाही, असे आव्हान नवनीत राणा यांनी शिवसेनेला दिले आहे. गेल्या काही दिवसांत शिवसैनिक आणि राणा दाम्पत्यांमध्ये जोरदार वाद रंगला आहे. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सुन आहे, माझ्याकडें दुहेरी ताकत आहे, असे राणा म्हणाल्या आहेत.
दरम्यान, अमरावतीतील राणा यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्यानंतर वाद वाढला आहे. नवनीत राणा आणि रवि राणा हे 23 तारखेला मुंबईत हनुमान चालीसा म्हणण्यासाठी येणार आहेत. परिणामी मुंबई पोलिसांनी राणांना नोटीस देखील बजावली आहे.