पुणे: करोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग बंद आहे. परिणामी, मार्केट यार्डातील हमाल, मापाडी आणि महिला कामगारांना काम नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांना मोफत अन्नधान्य कीट आणि प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात यावी, या मागणीचे पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांना देण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्वव ठाकरे आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे यापूर्वीच ही मागणी करण्यात आली आहे.
लातूर, अहमदनगर बाजार समितीने कामगारांना मदत देण्याच्या योजनेची अंमलबजावनी करण्यात येत आहे. पुणे बाजार समितीनेही ही योजना राबवावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य हमाल, मापाडी महामंडळाचे सहचिटणीस हनुमंत बहिरट, खजिनदार नवनाथ बिनवडे, संघटक संतोष नांगरे आणि गोरख मेंगडे यांनी दिली.केंद्रीय अन्न महामंडळाप्रमाणे मापाडी, हमालांचा विमा उतरविण्याची महामंडळाने यापूर्वीच राज्य सरकारकडे केली आहे.