ओटावा, (कॅनडा) – कॅनडातील खलिस्तानी नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या मुद्यावरून भारतीय उच्चायुक्तांनी कॅनडातील तपास यंत्रणेची खिल्ली उडवली आहे. निज्जरच्या हत्येमागे भारतीय गुप्तचरांचा हात असल्याबाबतचे पुरावे कॅनडाच्या तपास संस्थांनी द्यावेत, अशी मागणी भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी एका खुल्या निवेदनाद्वारे केली आहे.
कॅनडातील एका आघाडीच्या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये वर्मा यांनी या पुराव्यांची मागणी केली आहे. निज्जरच्या हत्या प्रकरणी भारताने सहाय्य करावे, अशी कोणतीही खा6ीलायक आणि संबंधित माहिती उपलब्ध नाही. असे त्यांनी या मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.
कॅनडा आणि बारताचे संबंध निज्जरच्या हत्येच्या प्रकरणावरूनच बिघडले आहेत. निज्जरच्या हत्येमागे भारतीय गुप्तचरांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत केला होता. भारत सरकारने हा दावा सपशेल फेटाळून लावला होता.
दोन्ही देशांनी एकमेकांच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी देखील केली होती. त्यानंतर निज्जरच्या हत्येशी संबंधित तपासाला सहकार्य करण्याची तयारी भारताने दाखवली. मात्र त्यापूर्वी भारतावरील आरोपाच्या समर्थनार्थ पुरावे कॅनडाने द्यावे, अशी मागणीही केली होती.
कॅनडाशी संबंध बिघडल्यानंतर भारत सरकारने काही काळासाठी कॅनडासाठी व्हिसा देण्याला स्थगिती दिली होती. तसेच भारतात कार्यरत कॅनडाच्या उच्च अदिकाऱ्यांची संख्याही कमी करण्याची सूचना केली होती.
पूर्वसूचना दिल्यानंतरही कॅनडाने अदिकाऱ्यांची संख्या कमी न केल्यामुळे 41 अधिकाऱ्यांना भारत सोडून जाण्याची अंतिम सूचनाही दिली. हे पाऊल उचलल्यामुळे कॅनडाच्या संसदेत पंतप्रदान ट्रुडो यांना विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.
भारतावर बिनबुडाचे आरोप केल्याबद्दल ट्रुडो यांच्यावर जगभरातून टीका झाली होती. खलिस्तानी नेता हरदीप सिंग निज्जर याला भारत सरकारने 2020 मध्ये दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्याची कॅनडामधील सरे या बागामध्ये जून महिन्यात दोन अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळ्या गालून हत्या केली होती.
सार्वभौमत्वाबाबत तडजोड नाही…
संजय कुमार वर्मा यांनी कॅनडाच्या आरोपाचे ठामपणे खंडन केले. भारताने गेल्या पाच-सहा वर्षांत अशांतता माजवणाऱ्या काही लोकांच्या प्रत्यार्पणासाठी कॅनडाला 26 वेळा विनंती केली होती. परंतु कॅनडाने कोणतीही कारवाई केली नाही, असे सांगितले.
कॅनडामध्ये आपल्याला आणि देशातील इतर भारतीय राजनैतिक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही मुद्दा उपस्थित केला. कॅनडाने केलेल्या बिनबुडाच्या आरोपांमुळे आता कॅनडाशी कोणतीही उच्चस्तरिय चर्चा केली जाऊ शकणार नाही, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही शनिवारी म्हटले होते.
तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांचा एकमेकांशी संवाद सुरू आहे. मात्र सार्वभौमत्व आणि संवेदनशीलतेच्या मुद्यावर कोणताही एकतर्फी संवाद होऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले होते.
कोटेशन
“निज्जरच्या हत्येमागे भारत किंवा भारतीय गुप्तचरांचा हात असल्याचे कोणी तरी उच्चपदस्थ म्हणाले होते. मात्र त्याचे पुरावे कोठे आहेत ? तपास संस्थांचा निष्कर्ष काय आहे? एक पाऊल पुढे जूान मी तर असे म्हणेन की हा तपास कलंकित झाला आहे.’ संजय कुमार वर्मा, कॅनडातील भारतीय उच्चायुक्त