नागपूर – बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माच्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटत रिलीज होताच एकच खळबळ उडाली. देशातील राज्यातील आणि शहरातील मुली, महिला गायब होण्याचा संख्येबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. आता प्रत्येक भागातून मुली महिला किती गायब झाल्या यांनी पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर येत आहे.
अशात, एका नामांकित वृत्तपत्राने नागपूर शहरातील मुली महिला आतापर्यन्त किती गायब झाल्या आहे याची आकडेवारीचा सविस्तर रिपोर्ट दिला आहे.
वृत्त पत्राने दिलेल्या आकडेवारीनुसार, नागपुरातून मागील चार महिन्यांत नऊशेहून अधिक लोक बेपत्ता झाल्याच्या किंवा हरविल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहे. यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त तक्रारी महिला हरविल्याच्या आहे. यादरम्यान साडेचारशेहून अधिक मुली किंवा महिला बेपत्ता झाल्या व याची दिवसाची सरासरी चार मुली किंवा महिला इतकी होती. या संख्येकडे लक्ष टाकले असता विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
लोकमत नागपूर वृत्तपत्राने दिलेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते ३० एप्रिल या कालावधीत शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये ९१२ लोक हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील ४७१ महिला होत्या. त्यातही १८ वर्षे किंवा त्याहून कमी वय असलेल्या मुलींचा आकडा चिंताजनक आहे. चार महिन्यांत ३६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्यातील बहुतांश मुली घरातून निघून गेल्या होत्या. घरातून निघून जाण्याची वेगवेगळी कारणे होती. तर आकडेवारीनुसार दर दिवसाला चार मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.