अलंकापुरीत ना ढोल-ताशांचा आवाज ना खिरापतीचा प्रसाद
आळंदी – दरवर्षी गणेशभक्तांनी गजबजलेला इंद्रायणी घाट यंदाच्या करोना संसर्गाच्या महामार्गामुळे असा निर्मनुष्य दिसत होता इथे ना खिरापत, ना मोदक, ना गणेश भक्त अशी अवस्था आज इंद्रायणी घाटावरील परिसरात चित्र पाहावयास मिळाले.
यंदाच्या करोनाच्या महामारीमुळे गेली दहा दिवसांपूर्वी घराघरात बसविण्यात आलेली गणपती बाप्पांना आज निरोप देताना ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषणा कानी पडल्या नाहीत किंवा रस्त्यावर ढोल-ताशांचा गजर देखील नाही. तसेच पवित्र अश्या इंद्रायणी नदीत दरवर्षी अलंकापुरीसह परिसरातील गावांमधील शेकडो गणेशाच्या मूर्ती विसर्जित करण्यासाठी येत असतात मात्र यंदा या सर्वांना तिलांजली देण्यात आली.
अत्यंत साधेपणाने गणेशाचे विसर्जन हे येथील शाळात क्रमांक एक ते तीन व वडगाव रस्ता या ठिकाणी आळंदी पालिकेच्यावतीने मूर्ती दान करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते त्यानुसार नागरिकांनीही अत्यंत योग्यरीत्या प्रतिसाद देत या ठिकाणी आपापल्या गणेशाच्या मूर्ती समर्पित केल्या.
यंदा एक गाव एक गणपती ही संकल्पना अलंकापुरीत राबविल्याने सार्वजनिक मंडळांचे एकही गणेश मूर्ती निदर्शनास आली नाही. यंदा इंद्रायणी घाटावर दरवर्षी सारखा गाजावाजा गणेश बघता यांचे दर्शन देखील झाले नाही.