नगर – महानगरपालिकेने 2017-18 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवात शहरातील अनेक गणेश मंडळांकडून अनामत रक्कम घेतली होती. ती रक्कम अद्यापही या मंडळांना परत दिली केलेली नाही. त्यामुळे महापालिका ही रक्कम संबंधित मंडळांना परत करणार का? असा प्रश्न मंडळांकडून उपस्थित केला जात आहे.
गेल्या एक-दोन वर्षापूर्वी महानगरपालिकेने शहरातील अंदाजे 300 मंडळांकडून मंडप उभारणी नुसार अनामत रक्कम घेतली होती. व ती रक्कम गणेश विसर्जना नंतर रक्कम मंडळांना देण्यात येणार होती. मात्र, अद्यापही या मंडळांना ही रक्कम देण्यात आली नाही. मंडप परवानगी देत्यावेळेस ही रक्कम संबधित मंडळांकडून घेतली. मात्र, महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये लेखाशिर्षक नुसून महासभेत कोणतेही मंडप धोरण ठरविण्यात आले नव्हते. त्यामुळे महानगरपालिकेने ही रक्कम संबंधित मंडळाना परत करावी अशी मागणी होत आहे.
गणेशोत्सवानिमित्त ही मंडळे वर्गणी जमा करून गणेश उत्सव साजरा करतात. मात्र, महानगरपालिका या मंडळांकडून अनधिकृत अनामत रक्कम वसूल करते. तेही कुठलाही ठराव नसताना. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने ही अनामत रक्कम संबंधित मंडळांना परत करावी, असे पत्र पालिका प्रशासनाला दिले आहे.
बाळासाहेब बोराटे, माजी विरोधी पक्ष नेता मनपा