Gandhi Jayanti – देशभरात आज महात्मा गांधींनात्यांच्या (Gandhi Jayanti) जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात येत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी दिल्लीत राजघाट येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींना (Gandhi Jayanti) अभिवादन केले. त्यातच मुंबईत देखील इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) वतीनं ‘मी पण गांधी’ पदयात्रा काढण्यात आली होती.
ही पदयात्रा मेट्रो सिनेमा – फॅशन स्ट्रीट – हुतात्मा चौक – महात्मा गांधी मार्ग – बाळासाहेब ठाकरे पुतळा – रिगल सिनेमा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – राजीव गांधी पुतळा – मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांचा पुतळा, असा पदयात्रेचा मार्ग ठरला होता.
पण, या पदयात्रेच्या वेळी काहीसा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) रॅलीसाठी जमलेले कार्यकर्त आणि पोलिसांची बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं.
पोलिसांकडून काँग्रेस कार्यालय परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यात आलं. यावेळी पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरु झाली आणि कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं दिसून आलं.
दरम्यान, या सगळ्या गदारोळात कार्यकर्त्यांनी रस्त्यातच महात्मा गांधी यांचा पुतळा बसून “रघुपती राघव राजाराम…’ हे भजन सुरु केलं. यावेळी वर्षा गायकवाड या देखील कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर बसल्या.
काँग्रेस नेत्या विद्या चव्हाण या देखील इथे आहेत. त्यांच्यासह अनेक दिग्गज नेते या रॅलीत आहेत. ही रॅली सुरुवातीला मंत्रालयाच्या दिशेला निघाली होती. मात्र, नंतर पोलिसांनी ही रॅली अडवली. आणि यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं.