नाशिक – महाराष्ट्रातील नाशिक शहरातील फळ मार्केटमध्ये मंगळवारी लागलेल्या आगीत किमान सहा दुकाने जळून खाक झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद रोडवरील पंचवटी परिसरातील फळ मार्केटमध्ये सकाळी 7.20 वाजताच्या सुमारास ही आग लागली.
दुकानातून धूर निघू लागला आणि पॅकिंग मटेरियलला आग लागली, असे त्यांनी सांगितले आहे. अग्निशमन दलाच्या किमान सहा गाड्या सेवेत लावण्यात आल्या आणि आग विझवण्याचे काम चार तास चालले, असेही अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले असून त्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.