Article 370 : जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणार्या घटनेतील कलम ३७० (Article 370) मधील तरतुदी रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून हे कलम हटवण्याचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या योग्य असल्याचे सांगितले आहे.
२०१९ पासून जम्मू-काश्मीरमध्ये अनेक मोठे बदल दिसून आले… या काळात अनेक विकास योजना राबवण्यात आल्या. दहशतवादी हल्ले कमी झाले आहेत. त्याचबरोबर पर्यटनालाही चालना मिळाली आहे. या चार वर्षात राजकारण, सुरक्षा, महिला सुरक्षा आणि शिक्षण इत्यादी क्षेत्रात काय बदल झाले ते अवश्य वाचा…
सुरक्षाविषयक सुधारणा
१. वर्ष २०१८ मध्ये २२८ दहशतवादी हल्ले झाले, ज्यात ९१ जवान शहीद झाले आणि ५५ निरपराध नागरिकांनी प्राण गमावले.
२. १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत केवळ ४१ दहशतवादी हल्ले झाले असून या कालावधीत २० जवान शहीद झाले असून १३ नागरिकांचा मृत्यू झाला
३. दगडफेकीच्या घटनाही संपल्या
४. जमावबंदी, संचारबंदी, सार्वजनिक उत्सवांवरील बंदी इतिहासजमा
राजकारणात काय बदलले?
१. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था लागू
२. प्रथमच ब्लॉक डेव्हलपमेंट कौन्सिलची निवड
३. पंचायत आणि नागरी संस्थांना अनेक अधिकार
४. मतदानापासून वंचित समाजांना मतदानाचा अधिकार
५. विधानसभेच्या ९ जागा अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव
आदिवासी शिक्षण
१. आठ नवीन आदिवासी वसतिगृहे आणि २०० स्मार्ट शाळा बांधल्या
२. सहा एकलव्य मॉडेल निवासी शाळा बांधल्या
३. आदिवासी समाजातील २ हजार लोकांचा कौशल्य विकास
४. आदिवासी समाजातील ४६ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
महिला सबलीकरण
१. प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी विशेष सेल स्थापन
२. पोलिसांमध्ये १५ टक्के महिला आरक्षण लागू
३. पोलिसांमध्ये दोन अतिरिक्त महिला बटालियन स्थापन
शिक्षण क्षेत्रात काय झाले?
१. आयआयटी आणि आयआयएम जम्मूमध्ये सुरू
२. एम्स जम्मू कार्यान्वित
३. एम्स काश्मीरचे बांधकाम सुरू
४. ५० नवीन पदवी महाविद्यालये सुरु
५. २८ बीएससी नर्सिंग आणि १९ बीएससी पॅरामेडिक कॉलेज सुरु
६. एमबीबीएसच्या ८०० जागा वाढवल्या
७. ५.५० लाख मुलांना मोफत चाचणी पुस्तके