नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या उमेदवारी अर्जात सादर केलेल्या काही माहितीविषयी भाजपने आक्षेप घेतला होता. राहुूल गांधी यांनी आपली डिग्री आणि नागरीकत्वाविषयी खुलासा करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. त्यानंतर अमेठीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांच्या अर्जातील काही तपशीलाला आव्हान देण्यात आले होते. यावर आज (सोमवारी) सुनावणी करण्यात आली आहे.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीमधून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज वैध ठरवत राहुल गांधी यांना दिलासा दिला आहे.