सोलापूर – कृषिपंपांना दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी “मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजने’ला गती देण्यात आली असून बारामती परिमंडल अंतर्गत महावितरणकडून स्वतःच्या उपकेंद्रांच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या 9575 किलोवॅट (9.5 मेगावॅट) क्षमतेचे 11 सौर उर्जा प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे.
बारामती परिमंडल अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात 3185 किलोवॅटचे चार प्रकल्प, तर बारामती मंडलमध्ये 3643 किलोवॅटचे पाच सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी व चाचणीचे काम पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसांत हे नऊ सौर प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत, तर सातारा जिल्ह्यात 2747 किलोवॅटचे दोन प्रकल्प यापूर्वीच कार्यान्वित झाले आहे. हे सर्व प्रकल्प महावितरणने 33/11 केव्ही उपकेंद्रांच्या जागेत उभारलेले आहेत.