कोल्हापूर(प्रतिनिधी) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेल्या बजेट नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या बजेटनं शेतकर्याला काहीही दिलेलं नाही. निर्मला सीतारामन यांनी पेपरलेस बजेट सादर केलं आणि शेतकरी ही पेपर लेस झालाय. शेतकऱ्याच्या खिशातील नोटा ही त्यामुळे गायब झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशात फक्त चिल्लरचा खुळखुळा राहिला असल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.