मुंबई – औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिले आहे.
नामांतराबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादचे नाव सरकारी दस्तावेजांवर बदलू नका, अशा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. यामुळे याचिकाकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावे बदलण्याच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, औरंगाबादच्या नामांतराच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी मुस्लिम बहुल विभागात नावे तातडीने बदलण्याची जणू मोहीमच हाती घेतल्याचा याचिकाकर्त्यांने न्यायालयात आरोप केला.
दरम्यान, यावर सुनावणी करताना नामांतराबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादचे नाव सरकारी दस्तावेजांवर बदलू नका, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. तर औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावरील याचिकेवरील सुनावणी 7 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.