नीरा नरसिंहपूर – नीरा नरसिंहपूर परिसरात उन्हाची तीव्रता वाढत आहे. शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्याला कसरत करावी लागत आहे. ही कसरत स्वतःच्या प्रपंचासाठी जीव धोक्यात घालून शेतकरी करीत आहे.
नीरा व भीमा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पाइपलाइन, मोटारी, स्टार्टरचे नुकसान झाले आहे. नुकसानीतून वाचलेली पिके जगविण्यासाठी शेतकरी पदरमोड करीत खरेदी करीत आहे.
बाजारपेठेतून विद्युत मोटारी, पाइप खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. विद्युत मोटारी, पाईपलाईन वाहून गेले आहेत. त्यामुळे जमिनी पाण्याने खचल्या आहेत. त्यात विद्युत मोटारीचा दुरूस्तीचा खर्च आ वासून उभा आहे. पोटाला चिमटा देऊन पिकवलेली शेती पुराच्या पाण्यात वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज काढून अथवा उसनवारी घेऊन शेती जगवावी लागत आहे.