अयोध्या : प्रभू रामचंद्र यांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या नगरीमध्ये श्रीराममंदिर उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानंतर आता लवकरच अयोध्यातील मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठपणा केली जाणार आहे. त्याची तारीख देखील आता निश्चित करण्यात आली आहे. पुढील वर्षी 21 ते 23 जानेवारी दरम्यान अयोध्येतील मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे निमंत्रण देखील देण्यात आल्याचे म्हंटले जात आहे.
श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी 21, 22 आणि 23 जानेवारी या तीन तारखा निश्चित करण्यात आल्या आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे. या सोहळ्यासाठी 25000 संताना आमंत्रित करण्याचे नियोजन असल्याची माहिती राय यांनी दिली. याबाबत ते म्हणाले, “या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात येणाऱ्यांची यादी बनवण्यात आली असून लवकरच श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांची स्वाक्षरी असणाऱ्या निमंत्रण पत्रिका पाठवण्यात येणार आहे. या 25000 संत 10000 खास पाहुण्यांपेक्षा वेगळे असतील जे रामजन्मभूमीच्या आवारात होणाऱ्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.”
या वर्षी डिसेंबरपर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ट्रस्टने कामगार आणि तंत्रज्ञांची संख्या वाढवली आहे. त्यादृष्टीने सध्या काम केले जात आहे. राम मंदिराच्या उभारणीत स्टील आणि विटांचा वापर करण्यात आलेला नाही. मुख्य मंदिराचे बांधकाम पाच एकर जमिनीत करण्यात येत असून इतर जमिनीवर संग्रहालय आणि ग्रंथालय सारखी केंद्र तयार करण्यात येणार आहेत. आयआयटी बॉम्बे, दिल्ली, मद्रास, गुहावटीचे विशेषज्ञ आणि केंद्रीय इमारत संशोधन संस्था आणि रुडकीचे तज्ञ आणि एल अँड टी आणि टाटा ग्रुपचे इंजिनिअर्स कॅम्पसच्या माध्यमातून राम मंदिराच्या नियोजसाठी योगदान देण्यात येत आहे.
राम मंदिराच्या उपक्रमांचा प्रारंभ करण्याआधी मंदिराला पुरातन रुप देण्यासाठी मंदिराचे डिझाइन फाइनल करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या उभारणीत कोणत्याही प्रकारच्या स्टीलचा वापर करण्यात येणार नाही. मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे दगड जोडण्यासाठी ताब्यांच्या पानांचा वापर करण्यात आला आहे.