नवी दिल्ली – नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. या हिंसाचारानंतर शेतकऱ्यांचा नरसंहार करण्यात आल्याचा हॅशटॅग ट्विटरवरून सुरू होता. याची दखल केंद्र सरकराने घेतली आहे.
अनेकांनी आपल्या अकाउंटवरून शेतकऱ्यांचा नरसंहार करण्यात आल्याचा हॅशटॅग वापरला. खोटा हॅशटॅग चालवण्याच्या या प्रकाराची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. हा हॅशटॅग आणि ज्या अकाउंटवरून हा हॅशटॅग चालवला गेला त्यावर कारवाई करा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करू, अशी फायनल नोटीसच केंद्र सरकारने ट्विटरला बजावली आहे. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने दिली.
#ModiPlanningFarmerGenocide हा हॅशटॅग वापरण्यात आला होता. प्रत्यक्षात असं काहीही घडलेलं नसतानाही हा हॅशटॅग वापरण्यात आला होता. त्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेऊन ट्विटरकडे तक्रार केली होती. ट्विटरनेही केंद्र सरकारच्या तक्रारीनंतर 250 ट्विटर अकाउंट ब्लॉक केले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा हे ट्विटर अकाउंट सुरू करण्यात आले. हे ट्विटर अकाउंट सुरू केल्यामुळे केंद्र सरकार अजुनच भडकले असून आता ट्विटरला कारवाईचा इशारा दिला आहे.