रोहन मुजूमदार
पुणे -जिल्ह्यात पाऊस दीर्घकाळ लांबल्याने उशिरा का होईना, पण रब्बी हंगामातील पेरण्यांना सुरुवात झाली. दरम्यान, ऐन हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास अतिपावसामुळे हिरावला गेला. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी शासनाकडे हात पसरण्याची वेळ आली. अशी वेळ रब्बी हंगामात येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी स्मार्ट होण्याची गरज आहे. म्हणूनच रब्बीतील पिकांसाठी “पंतप्रधान पीक विमा कवच’ घेतल्यास संभाव्य नुकसानीची भरपाई मिळण्यास सुलभ होणार आहे.
याचा हप्ता अत्यल्प असून फायदा मात्र अधिक आहे. बागायती, जिरायती ज्वारीसाठी 30 नोव्हेंबर, रब्बी कांदा, बागायती गहू, हरभरासाठी 15 डिसेंबर 2020, तर उन्हाळी भुईमूगासाठी हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकांना “विमा कवच’ घ्यावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी सांगितले.
खरीप हंगाम हातचा गेला आहे. रब्बीच्या हंगामात असा फटका अर्थात अवकाळी पाऊस, गारपीट व नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळावी, यासाठी रब्बी पिकांनाही पंतप्रधान पिकविमा योजना लागू करण्यात आली आहे. यात सहभागी होण्यासाठी कर्जदार आणि बिगर कर्जदारांसाठी अर्जाची अंतिम मुदत समानच आहे. याचा हप्ता अत्यल्प असून लाभ मात्र अधिक असल्याने शेतकऱ्यांनी पिकास “विमा कवच’ घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.
पीक विमा योजनेसाठी 2020-21 या हंगामाच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय पीक विमा संकेतस्थळ कार्यान्वित झाले आहे. जिल्ह्यातील अधिसूचित क्षेत्रातील पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरून योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यासाठी एचडीएफसी इरगो इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंक व राष्ट्रीयकृत बॅंक तसेच शेतकरी स्वत: पीक विमा पोर्टलवररुुु.िाषलू.र्सीें.ळप ऑनलाइन अर्ज करू शकतात, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील तंत्र अधिकारी प्रमोद सावंत यांनी दिली.
या कागदपत्रांची आवश्यकता
आधार कार्ड/आधार नोंदणीची प्रत, 7/12 उतारा, भाडेपट्टा असल्यास करारनामा, सहमतीपत्र, पीक पेरणी स्वयं घोषणापत्र, पासबुकची प्रत सादर करून इलेक्ट्रॉनिक साक्षांकन करणे बंधनकारक आहे. पीक विमा भरताना शेतकऱ्यांनी आपला बॅंकेचा खातेक्रमांक, पिकाखालील क्षेत्र, भूमापन क्रमांक आदी खातरजमा करावे. जेणेकरून भविष्यात पीक विमा मंजूर झाल्यानंतर तक्रारी उद्भवणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी आहे.
कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजना ऐच्छिक आहे.
खातेदाराच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत.
योजनेतील पिकांसाठी 70 टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे.
योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता, रब्बी हंगामासाठी 1.5 व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधा
उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची शाखा, राष्ट्रीयकृत बॅंकेची शाखा, जवळच्या विविध कार्यकारी सोसायट्या.
या कारणांसाठी विमा मिळेल
हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान
पिकांच्या हंगामामध्ये हमावामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान
काढणीपर्यंत कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर येणे, भूस्खलन, दुष्काळ, कीड व रोग आदी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट
स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणार नुकसान
नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान
पीकनिहाय विम्याची माहिती
पीकशेतकऱ्यांचा हिस्साविमा संरक्षित
(प्रति हेक्टरी)रक्कम
ज्वारी बागायती45030 हजार
ज्वारी जिरायती37525 हजार
गहू बागायती57038 हजार
हरभरा52535 हजार
रब्बी कांदा4 हजार80 हजार
उन्हाळी भुईमूग60040 हजार