हैदराबाद – दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनात गेल्या सुमारे वर्षभरात साडे सातशे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी तीन लाख रूपयांची मदत करण्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केली आहे.
ही मदत तेलंगणा राज्य सरकारच्यावतीने केली जाणार आहे. त्यांच्या या घोषणेने भाजपला मोठी चपराक दिली गेली आहे असे मानले जात आहे. मुख्यमंत्री राव यांनी या शेतकरी कुटुंबियांना केंद्र सरकारने प्रत्येकी 25 लाख रूपयांची मदत केली पाहिजे अशी मागणीही पत्रकार परिषदेत केली.
शेतकरी आंदोलनाच्या काळात देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे.