राजकीय टीकेसाठी विरोधकांकडून खोटी माहिती – अमित शहा
नवी दिल्ली – काश्मीर खोऱ्यातल्या परिस्थितीबद्दल विरोधी पक्षांकडून खोटी माहिती दिली जात आहे. काश्मीरमध्ये कोणतेही निर्बंध घातले गेले नाहीत, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी रविवारी स्पष्टपणे सांगितले. “निर्बंध कोठे आहेत? ते फक्त तुमच्या मनात आहे. जम्मू काश्मीरमध्ये कोणतेही निर्बंध नाहीत. केवळ निर्बंधाबाबत चुकीची माहिती पसरविली जात आहे, असे राष्ट्रीय सुरक्षा विषयावरील चर्चासत्रात बोलताना अमित शहा म्हणाले.
काश्मीरमधील 196 पोलिस ठाण्यांपैकी केवळ आठ स्थानकांशिवाय सर्व ठिकाणी कर्फ्यू हटविण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दशकांपूर्वी झालेल्या दहशतवादामध्ये 41,800 पेक्षा जास्त लोकांचे प्राण गमावले. शहिद जवान, त्यांच्या विधवा किंवा अनाथ मुलांचे मानवी हक्क उल्लंघन करण्याचा मुद्दा कोणी उपस्थित केला नाही.
परंतु काही दिवसांपासून मोबाईल कनेक्शनच्या अभावावर लोक आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. फोन कनेक्शनचा अभाव हे मानवाधिकारांचे उल्लंघन नाही. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन महिन्यांत 10,000 नवीन लॅंडलाईन कनेक्शन सुरू केले गेले आहे, असेही शहा यांनी निदर्शनास आणून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या धाडसी पाऊल्यामुळे हे राज्य येत्या 5 ते 7 वर्षांत सर्वाधिक विकसित प्रदेश होईल. असे
कलम 370 रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचा उल्लेख करतांना ते म्हणाले. नुकत्याच न्यूयॉर्कमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्र आमसभेत सर्व जागतिक नेत्यांनी कलम 370 वरील भारताच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. सर्व जागतिक नेते सात दिवस न्यूयॉर्कमध्ये जमले होते. पण एकाही नेत्याने पाकिस्तानची बाजू घेतली नाही. सर्वांनीच भारताला पाठिंबा दर्शविला.
पंतप्रधान मोदींचा हा एक मोठा मुत्सद्दी विजय आहे, असे अमित शहा म्हणाले.
तथापि, चीनने संयुक्त राष्ट्र संघात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता आणि वाद संयुक्त राष्ट्राच्या ठरावांनुसार आणि द्विपक्षीय कराराच्या अनुषंगाने शांततेत व योग्य पद्धतीने सोडवायला हवा, असे म्हटले होते. यासंदर्भात भारताने कडक शब्दांत दखल घेतली आणि सांगितले की या प्रदेशातील अलीकडील घडामोडी देशासाठी संपूर्णपणे अंतर्गत बाब आहेत, असे सुनावले आहे.