नवी दिल्ली – देशातील साखर कारखान्यांना चालू नोव्हेंबर महिन्यात आपल्या कडील 20.5 लाख टन साखरेचा कोटा विक्रीसाठी खुला करण्यास केंद्र सरकारने अनुमती दिली आहे. हा कोटा देशातील 535 कारखान्यांना विभागून वाटला जाणार आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने जितका साखर कोटा विक्रीसाठी खुला केला होता त्यापेक्षा यंदाचा कोटा 1.5 टनांनी कमी आहे. तथापी या महिन्यात सणासुदीचा काळ नसल्यामुळे साखरेला फार मागणी राहणार नाही त्यामुळे यंदाच्या नोव्हेंबर महिन्यातील हा कोटा कमी ठेवण्यात आला आहे असे संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आणि अन्य सण असल्याने गेल्या वर्षीै जादा साठा विकण्यास अनुमती देण्यात आली होती. केंद्र सरकारने सन 2019-20 या वर्षात साखरेचा 40 लाख टनांचा बफर स्टॉक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान येत्या 15 नोव्हेंबर पासून देशात नवीन उस गाळप हंगाम सुरू होंत आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात देशात 331 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. तर देशांतर्गत मागणी 250 ते 260 दशलक्ष टन इतकी होती.